Type Here to Get Search Results !

दोन वर्षांपूर्वी "आजच्याच" दिवशी लागला होता पहिला जनता कर्फ्यू!

 


करोनाच्या महामारीच्या रूपाने अनेक दशकातील सर्वात मोठे संकट जगासमोर आले होते. २०१९ ला चीनमध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर जगभर पसरला. जगभरातील एकेक देशांमध्ये लॉकडाऊन लागायला सुरुवात झाली. भारतातही लॉकडाऊनच्या आधीची पायरी ही जनता कर्फ्युला आहे. या कर्फ्यूला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन वर्षात भारतामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या, देशातल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.



अनेक नागरिकांना कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये उपचाराविना आपला जीव गमवावा लागला. करोना काळात एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे कोरोनाच्या उपचारासाठी लागणारा लाखो रुपयांचा उपचार या सर्व गोष्टींच्या खर्चात सामान्य लोक अडकले. पैशाच्या अभावी अनेकांना उपचार मिळाले नाहीत आणि त्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेच्या वेळी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना रुग्णालयामध्ये तसेच रुग्णालयाच्या बाहेर जीव सोडावा लागला. याचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि केरळला बसलाया महामारीमुळे अनेकजणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात आणि शहरात प्रेतांच्या विल्हेवाटासाठी स्मशानभूमीही अपुर्‍या पडायला लागल्या करोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन लागल्यानंतर सर्वाधिक फटका हा स्थलांतरीत मजुरांना बसला. 



लॉकडाऊन लागल्यानंतर सर्वात मोठा परिणाम झाला तो देशातील व्यवसायांवर. देशातील अनेक छोटे मोठे व्यवसाय या काळात बंद झाले.लॉकडाऊन लागल्यानंतर याचा मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर हि झाला. या काळात देशाची जीडीपी हा नकारात्मक गेला आणि देशाची अर्थव्यवस्था पार कोलमडली. कृषी, व्यापार आणि सेवा ही तीनही क्षेत्रे कोलमडली. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies