मुंबई: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची जयंती यावर्षी कोरोनाचे संकट कमी झाले आहे. त्यामुळे आरोग्याच्या नियमांचे पालन करून हा जयंती आपण उत्साहात साजरी करूया. यासंदर्भात आज परिपत्रक गृह विभागाच्यावतीने लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत सांगितले आहे. महापरिनिर्वाण दिनाप्रमाणेच 14 एप्रिल रोजी राज्यशासनामार्फत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यास गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मान्यता दिली आहे. त्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल रोजी रोजी होणाऱ्या 131 व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसंदर्भात आज सहयाद्री अतिथीगृह आयोजित बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते त्यावेळी त्यांनी हे सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे,गेली दोन वर्षे डॉ. बाबासाहेबांची जयंती उत्सव व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अशा दोन्हीही कार्यक्रमात आपण कोरोना निर्बंधांमुळे संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले, ही खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. आता हे कोरोनाचे सावट कमी झाले आहे आणि या महामानवाची जयंती आपण सर्वांनि उत्साहाने साजरी करायची आहे. तसेच, महानगरपालिका आणि पोलीस यांनी नेहमीप्रमाणे संपूर्ण नियोजन व तयारी केली आहे. राज्यभरातदेखील उत्साहाने तसेच आरोग्याचे नियम पाळून हा उत्सव साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आले आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.