सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. सांगली जिल्ह्याशी काही संबंध नसताना शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन नको, त्यात इतर स्थानिक नेत्यांची नावे वगळण्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
तसेच आतापर्यंत तुम्ही किती उद्घाटन केली कंटाळा आला नाही का ? असा खोचक सवाल सदाभाऊ खोत यांनी पवारांना केला आहे. “आम्ही आता सिक्सच मारणार आणि उद्घाटन करणार, कितीही पोलीस बळाचा वापर केला तरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन होणारच”, अशी ठाम भूमिका गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पुतळ्याचा वाद पेटला आहे.