आंध्रप्रदेश: आंध्रप्रदेशमधील चित्तूर येथे एका बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपाघात भीषण असल्यामुळे यामध्ये ७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ४५ जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हि घटना तिरुपतीपासून २५ किलोमीटर अंतरावर बकरापेट येथे घडल्याचे उघडकीस आले आहे.
घटनास्थळ, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस उंच कड्यावरून खाली कोसळली व यामध्ये ७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे व ४५ जन जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.