या पार्श्वभूमीवर बाोलाना राऊत म्हणाले की, राज्यात वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू राहिल्यास आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात तापमानात वाढ झाली आहे. विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच कोळसा टंचाईमुळे संकट निर्माण झाले आहे; परंतु, सध्य़ा तरी राज्यात वीज प्रकल्प सुरू ठेवण्यात यश मिळाले आहे. विजेच्या मागणीत सध्या २८ मेगावॅटपर्यंत वाढ झाली आहे.
राज्यात कितीही बिकट परिस्थिती आली तरी वीजपुरवठा खंडित होणार नाही. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सरकारचे खासगीकरणाचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करणार नाही, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली.