पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील चार विद्यार्थ्यांवर बंदी घातली आहे. एमपीएससी आयोगाने या विद्यार्थ्यांवर कायमस्वरूपी बंदी घालत परीक्षा देता येणार नसल्याचे सांगितले आहे. यामध्ये नागरे शुभम भारत रामकिशोर धनराज पवार यांचावर बनावट प्रवेशपत्र अनुक्रमे वापर व तयार केल्याचे समोर आले आहे. मनोज रतन महाजन याने परीक्षेनंतर मूळ उत्तरपत्रिका सोबत घेऊन गेला होता. तर विठ्ठल भिकाजी चव्हाण याने समाजमाध्यमावर आयोगास शिवीगाळ केली होती. यामुळे या चौघांवर ही कारवाई करण्यात आली आहे. आयोगाने आपल्या ट्विट करून ही माहिती दिली आहे.
आयोगाकडून खालील उमेदवारांना कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात आले आहे:-१.नागरे शुभम भारत व २.रामकिशोर धनराज पवार-बनावट प्रवेशपत्र अनुक्रमे वापर व तयार करणे. ३.मनोज रतन महाजन-परीक्षेनंतर मूळ उत्तरपत्रिका सोबत घेऊन जाणे. ४.विठ्ठल भिकाजी चव्हाण-समाजमाध्यमावर आयोगास शिवीगाळ करणे.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) March 31, 2022
राज्य लोकसेवा आयोगाकडूना अनेकदा परीक्षा पुढे ढकलल्या, कधी परीक्षा रद्द झाल्याच्या , उत्तरपत्रिकेतील गुणांमध्ये घोळ झाल्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत. यातून अनेक विद्यार्थी आयोगाच्या विरोधात जोरदार आपली भूमिका मांडता असतात. नाराज झालेलया विद्यार्थ्यांकडून केल्याच्या जाणाऱ्या टिप्पणीवर आयोगाने हस्तक्षेप नोंदवला होता. या प्रकारच्या टीकेला रोखण्यासाठी आयोगाने पत्रक काढले होते. या पत्रकामध्ये एखाद्या विदयार्थ्याने आयोगाकडून होणाऱ्या भरती प्रक्रिये संदर्भात आपले मत नोंदवताना योग्य भाषे नोंदवावे असे सांगण्यात आले होते. कोणत्याही विद्यार्थ्याने आपले मत नोंदवताना असभ्य ,असंस्कृत, व असंसदीय व अश्लील भाषेत टीका केल्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा सुचना दिली होता. विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या टीका -टिप्पणीवर आयोगाने आक्षेप घेतल्यास त्या विद्यार्थ्याला परीक्षेलाही मुकावे लागेल असे म्हटले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयोगाने परिपत्रक काढत ही माहिती दिली होती.