नवी दिल्ली : कार आणि इतर वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी भारतात बरेच प्रयत्न केले जात आहेत आणि त्यातील एक प्रयत्न म्हणजे हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या कार बाजारात आणणे. ग्रीन हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या अशाच एका कारच्या मदतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी संसदेत पोहोचले. टोयोटा मिराई असे या कारचे नाव आहे. टोयोटाने पायलट प्रोजेक्ट अंतर्गत ही कार तयार केली असून त्यात अत्याधुनिक इंधन सेल यंत्रणा बसवली आहे. ही सिस्टम सेल ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचे मिश्रण करून एका विशेष प्रक्रियेद्वारे वीज निर्माण करते. या विजेच्या साहाय्याने गाडी धावते.या कारच्या मदतीने नितीन गडकरी बुधवारी संसदेत पोहोचले. या कारमधून उत्सर्जनाच्या स्वरूपात केवळ पाणी बाहेर येते .
या कारबाबत बोलताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ही कार पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. तसेच या कारमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. ते पुढे म्हणाले की ही कार भारताचे भविष्य आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहने मोठ्या प्रमाणात प्रदूषण करतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे, परंतु हायड्रोफ्यूल कारमुळे प्रदूषण होत नाही.
टोयोटाने नुकतीच आपली हायड्रोजन कार टोयोटा मिराई भारतीय ऑटोमोबाईल बाजारात लॉन्च केली आहे. हायड्रोजन फ्यूल कारच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे तर, यामध्ये इंधन भरणे सोपे आहे. पेट्रोल आणि डिझेल प्रमाणे हे फ्यूल देखील 2-3 मिनिटात भरले जाऊ शकते. हायड्रोजन पॉवर कारमधील प्रेशर टँकमध्ये हायड्रोजन साठवता येते. त्यानंतर ते वीज निर्मितीसाठी फ्यूल सेलमध्ये हस्तांतरित केले जाते.