बिहारमध्ये बांधकामाधीन असलेल्या एका पुलाचा काही भाग २९ एप्रिल रोजी कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेचं कारण विचारले असता IAS अधिकाऱ्याने दिलेल्या उत्तराने चाक्य झाले. एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी हा किस्सा सांगितला आहे.
काल नितीन गडकरी म्हणाले, "२९ एप्रिलला बिहारमध्ये पूल कोसळला. मी माझ्या सचिवाला या दुर्घटनेचे कारण विचारले. तेव्हा त्याने मला सांगितलं की जोराचा वारा सुटल्याने पूल कोसळला. मला एक समजत नाही, हवेने कसा काय पूल कोसळू शकतो? काहीतरी चूक झाली असणारच.
१७१० कोटी खर्चून उभारला जात असलेला पूल जोराचा वारा सहन करू शकत नसेल तर हा चौकशीचा विषय असल्याचे गडकरींनी म्हटले आहे. ३११६ मीटर लांबीच्या या पुलाचं काम २०१४ मध्ये सुरू झाले होते. २०१९ मध्ये ते पूर्ण होण अपेक्षित होते. मात्र अजूनही हे काम सुरूच आहे. सुलतानगंजचे आमदार ललित नारायण मंडल यांनी याआधी मुख्यमंत्र्यांनी पूल दुर्घटना प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती दिली होती.