मुंबई: आग्रा राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. मालेगाववरून कांदा घेऊन मध्य प्रदेशकडे एक ट्रक भरधाव वेगात चालला होता.मालेगावकडून मध्यप्रदेशकडे खूप वेगात चाललेल्या एका ट्रकने आपे रिक्षाला धडक दिली. या अपघातात क्रूझर आणि रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. यात तिघांचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींवर जवळच्याच रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जखमी झालेल्या व्यक्ती पारोळा तालुक्यातल्या तरडी गावचे रहिवासी असल्याची माहिती हाती येत आहे.