नांदेड : नांदेड-हैदराबाद महामार्गावर सोमवारी सायंकाळी भरधाव वेगात येणाऱ्या कंटनेरने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षात बसलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कंटेनरने रिक्षाला 100 फूट फरपटत नेले.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील नांदेड-हैदराबाद महामार्गावरील मेनुर जवळ भरधाव आलेल्या कंटनेरने प्रवासी रिक्षाला धडक दिली. या धडकेत रिक्षाचालकासह रिक्षातून प्रवास करणाऱ्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कंटेनरने रिक्षाला अक्षरश: 100 फूट फरफटत नेले. त्यामुळे रिक्षाचा चूरा झाला.
दरम्यान, हा भीषण अपघात घडताच कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी ताघटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करत पोलिसांनी पाचही मृतदेह ताब्यात घेतले. याप्रकरणी बिचकुंदा पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.