मुंबई: येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागात पुढील 3 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे 3 दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
तसेच, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, मुंबई, ठाणे भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.