Type Here to Get Search Results !

“दोन वाडपे व्यवस्थित वाढत असतील तर 40 जणांची (मंत्रिमंडळाची) काय गरज...”: सदाभाऊ खोत!



सांगली – राज्याच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. परंतु राज्यात शिंदे  सरकार स्थापन झाल्यापासून फक्त हे दोनच शपथविधी संपन्न झाले आहेत. अजूनही राज्यात मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही. त्यामुळे सध्या राज्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार चालवत आहे, या पार्श्वभूमीवर बोलत असताना सदाभाऊ खोत यांनी टोला लगावला आहे.




यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले,  सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार चालवत आहेत. चांगले काम सध्या महाराष्ट्र मध्ये सुरु आहे. दोन वाडपे व्यवस्थित वाढत असतील तर 40 जणांची काय गरज आहे, असे वक्तव्य करत खोत यांनी टोला लगावला आहे. 



तसेच ते पुढे म्हणाले, “सरकार नसल्यावर लय वाईट परिस्थिती असते. सत्ता असताना माणसाच्या घरासमोर 1 किलोमीटरपर्यंत सकाळी सकाळी रांग असायची. सत्ता गेल्यावर मात्र सगळी गर्दी गायब झाली असेही खोत म्हणाले. 


दरम्यान,  क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सदाभाऊ खोत उपस्थित होते .त्यावेळी ते बोलत होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies