आटपाडी : आटपाडी तालुक्यातील माळेवाडी गावच्या रेशन दुकानचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिनांक १८ फेब्रुवारी 2021 रोजी कायमस्वरूपी परवाना रद्द केला होता. तरीही माळेवाडी रेशन दुकानदाराने जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा आदेश खोटा ठरवण्यासठी मंत्री विश्वजीत कदम यांच्या कडे अर्ज दाखल केला होता. त्या नंतर त्यावर सुनावणी होऊन सदर दुकानदार हा दोषी असल्याचे निष्पन्न झाले. त्याच बरोबर सदर दुकानदार हा माध्यमिक शिक्षक आहे व तोच रेशन दुकान चालक आहे. त्यामुळे सदर दुकानदाराने शासनाची दुहेरी दुहेरी फसवणुक केली आहे असे आरोप मनसे तालुका कृषी अध्यक्ष प्रकाश गायकवाड, लालासाहेब जाधव उत्तम बालटे यांनी केला आहे.
याबाबत प्रकाश गायकवाड यांनी ही दि १९/४/२०२२ रोजी मंत्री विश्वजीत कदम यांना निवेदन दिले होते. त्या नंतर मंत्री विश्वजीत कदम यांनी सांगली जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा निकाल कायमस्वरूपी केला आहे. त्याच बरोबर झालेली फसवणुक व दंडाची रक्कम ही फौजदारी गुन्हा दाखल करून वसुल करण्यात यावी अशी मागणी लालासाहेब जाधव व प्रकाश गायकवाड उत्तम बालटे यांनी केली आहे. असे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे,