Type Here to Get Search Results !

पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी टोल माफीसाठी आमच्याशी संपर्क साधा; केले पोलीसांनी आवाहन

 




सातारा : आषाढी एकादशी निमित्त वारकरी आषाढी वारीस  पंढरपूरला जात आहेत. या वारक-यांच्या तसेच भाविकांच्या वाहनांना राज्य शासनाने 15 जूलैपर्यंत पथक करातून सूट म्हणजे टोल माफी जाहीर केली आहे. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

यांनी नुकताच जाहीर केला. त्यानंतर त्याची सातारा जिल्ह्यात सात जूलैपासून अंमलबजावणी सुरु झाली. दरम्यान टोल माफी 

यासाठी वारक-यांनी अथवा भाविकांनी सातारा पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले आहे. 

यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी सातारा जिल्ह्यातून आनेवाडी टोलनाका व तासवडे टोलनाका येथे भाविकांच्या पालख्या, हलक्या व जद वाहनांना असुविधा होऊ नये यासाठी पथकर सवलतीचे स्टिकर्स देण्यात येणार आहेत.

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जाणा-या भाविकांनी त्यांचे वाहनांना सवलतीचे स्टिकर्स पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा विशेष शाखाभुईंज पोलीस ठाणे, तळबीड पोलीस ठाणे येथून उपलब्ध करुन घ्यावेत.

 तसेच आनेवाडी तो ल नाका व तासवडे टोल नाका येथे असुविधा निर्माण झाल्यास भुईंज पोलीस ठाणे, तळबीड पोलीस ठाणे तसेच टोलनाका येथे उपस्थित असणारे पोलीस अधिकारी किंवा अंमलदार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले आहे

.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies