Type Here to Get Search Results !

‘या’ जिल्ह्यात २० गावांना भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!



हिंगोली :  हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील तब्बल 20 गावांना अचानक भूकंपाचे हादरे बसले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


याबद्दल अधिक माहिती अशी कि,  वसमत तालुक्यातील वापटी कुपटी शिरळी कुरुंदा पांगरा, राजवाडी आमदरी या गावासह परिसरातील 20 गावांना आज सकाळ पासून दोन वेळा हादरे बसल्याने नागरिक घराच्या बाहेर बसले आहेत. आमच्या गावात बसलेले हादरे हे भूकंपाचे असल्याची माहिती नागरिक देत आहेत. परंतु, हे हादरे भूकंपाचे आहेत की, नाही या बाबत अद्याप प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.


दरम्यान,  गावकऱ्यांना बसलेल्या हादऱ्यांबाबत लातूर येथील भूमापक केंद्राला सांगण्यात आले असून, त्यांच्या अहवालानंतरच या हादऱ्याचे कारण स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies