मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. शिवसेनेतून बंडखोरी केलेले आमदार आणि भाजप एकत्र येत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, मंत्रिमंडळाचा विस्तार अजुनही झालेला नाही. त्यामुळे शिंदे गटात नाराजी पसरल्याची समोर येत आहे.
मंत्रिमंडळाचा मुहूर्त लांबल्याने शिंदे गटात अंतर्गत तसेच, ईच्छुक आमदारांच्या मतदारसंघात नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यांचा शपथविधी झाल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे सांगण्यात आले होते, पण अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. मतदारसंघात नाराजी पसरल्याची माहिती एकनाथ शिंदे यांना आमदार देत आहेत.त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.