मुंबई: मुसळधार पावसामुळे राज्यात काही पूरस्थिती निर्माण झाली होती, मागिल तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आता पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
उद्यापासून मुंबईसह कोकण, नाशिक, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा राज्यात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. मागील काही दिवपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली होती.
रविवारी आणि सोमवारी मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. आता पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच, पुढच्या २४ तासात पालघर, नाशिक, पुणे, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा आहे.