Type Here to Get Search Results !

“त्यांनी” शिवसेना संपविण्याचा घाट घातला होता: उदय सामंत यांनी केले स्पष्ट वक्तव्य!


रत्नागिरी : आजही मी शिवसेनेतच आहे. मला भेटणा-या प्रत्येक कार्यकर्त्याला, पदाधिका-याला हेच मी सांगत आहे. त्याहूनही सर्वांना माझे एकच सांगणे आहे कोणीही विचलित होऊ का. आगामी काळाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा देखील गैरसमज दूर होईल असा विश्वास आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला.



तसेच ते पुढे म्हणाले, “आजपर्यंत मी कुणावरही टीका केला नाही आणि करणार देखील नाही. अडीच वर्षे रखडलेल्या मेडिकल कॉलेजच्या कामाला गती मिळाली आहे असे सांगत सामंत म्हणाले गेल्या अडीच वर्षात घटक पक्षाने किती वाव दिला हे महत्वाचे आहे. त्यांनी शिवसेना संपविण्याचा घाट घातला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला आणि आपल्या मतदारसंघासासाठी काही कमी केले नाही असेही सामंत यांनी वक्तव्य केले. मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मी मोहिमेत सहभागी झालो याचा मला अभिमान असल्याचे उदय सामंत यांनी सांगत शिवसेनेला डाग लागेल, ती संपेल असे आम्ही काही करणार नाही असेही भाष्य केले.



शिंदे गटात गेल्यानंतर आमदार उदय सामंत पहिल्यांदाच रत्नागिरी मतदारसंघात दाखल झाले. पाली येथील निवासस्थानी सामंत यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, शिवसेना आणि युवा सेना पदाधिकारी हे सामंत यांच्या निवासस्थानी आले होते. तसेच, रत्नागिरीतील पाऊस परिस्थितीचा आढावा उदय सामंत यांनी आज घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत वरील वक्तव्ये केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies