मुंबई: महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये गेलाय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. कारण हे सरकार बेकायदेशीर आहे, असे संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे. तसेच, महाराष्ट्र वाऱ्यावर आहे, राज्यपाल आता कुठे आहेत? असा प्रश्नही संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले, “ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. कारण हे सरकार बेकायदेशीर आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. तसेच, ‘अजून काहीच सुरू झाले नाही, राज्यात पुरामुळे अनेक ठिकाणी लोक मृत्यू पडत आहेत. अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर सरकारचे लक्ष नाही. महाराष्ट्र वाऱ्यावर पडलाय, राज्यपाल कुठे आहेत आता? घटनेचे पालन आता तरी राज्यपालांनी करावे, असे म्हणत संजय राऊत यांनी थेट राज्यपालांना प्रश्न विचारला आहे. तसेच, मंत्रालय ठप्प पडले आहे. शपथ घेऊन देखील कामकाज सुरू झाले नाही. मंत्री अजून का बनले नाही?", असाही संजय राऊत यांनी प्रश्न केला आहे.
तसेच, "या शब्दांवर बंदी घालण्याची वेळ सरकारवर का आली? हे सर्व शब्द भविष्यात सरकारविरोधात वापरले जाऊ शकतात. या भीतीतून हे झालंय का? या देशातला भ्रष्टाचार संपूर्णपणे संपलाय का? विधीमंडळ, स्थानिक स्वराज्य, पालिकेत भ्रष्टाचार झाला असेल तरी शब्द वापरायचा नाही? ही कुठली हुकूमशाही?", दरम्यान, संसदेत काही शब्दांवर बंदी घातली आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत हे वक्तव्य केले आहे.