अमरावती: आज पहाटेपासून मेळघाटात मुसळधार पाऊस सुरू आहे. मेळघाटातील सिपणा नदीला महापूर आला आहे, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या नदीच्या प्रवाहात एक युवक वाहून गेला. कृष्णा कासदेकर असे या युवकाचे नाव आहे.
पुढील दोन दिवस मुंबईत भारतीय हवामानशास्त्र विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई शनिवारी 'रेड' अलर्टवर होती पण फक्त २.२ मिमी पाऊस झाला. मात्र, पाऊस सुरूच होता. महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांतील १३० गावांमध्ये अतिवृष्टी झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात येणाऱ्या या गावांमध्ये पावसानंतर पूरस्थिती निर्माण झाली असून, त्याचा फटका अनेक लोकांना बसला आहे.