Type Here to Get Search Results !

“मातोश्रीचे दार पुन्हा उघडले, तर मी पुन्हा जाईल” : ‘या’ बंडखोर आमदाराचे मोठे वक्तव्य!



मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, मंत्रीमंडळ विस्ताराला वेळ असल्याने बंडखोर आमदार स्वत:च्या मतदार संघात पोहचले आहे. दिग्रज दारवा मतदारसंघातील बंडखोर आमदार संजय राठोडही त्यांच्या मतदारसंघात पोहचले आहे.



शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड हे यवतमाळ येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संजय राऊत यांच्यामुळेच ही वेळ असल्याचा आरोप आमदार राठोड यांनी केला. तसेच मातोश्रीचे दारे पुन्हा आमच्यासाठी उघडल्यास मी पुन्हा जाईल असेही संजय राठोड यांनी वक्तव्य केले.



तसेच संजय राठोड म्हणाले, “आमची भूमिका हिंदुत्ववादीच आहे. आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्हाला आशा आहेत की, मातोश्रीचे दारं आज नाही तर 6 महिन्यानंतर आमच्यासाठी उघडतील. त्यावेळी आम्ही मातोश्रीवर नक्की जाऊ. संजय राऊत यांच्यामुळेच आमच्यावर बंडखोरची वेळ आली. असंही संजय राठोड यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies