Type Here to Get Search Results !

“धनुष्यबाण गेला तर शिवसेनेचे नवे चिन्ह घरोघरी पोहोचवण्याची कंबर कसा”; उद्धव ठाकरे!



मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना आपल्या सोबत घेत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले आणि स्वतः मुख्यमंत्री बनले. या सर्व प्रक्रियेला न्यायालयाच्या पातळीवर त्यांना झालेली मदत पाहता शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हदेखील काढून घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आता या संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे.



शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, "कायद्याने जो काही लढा द्यायचा तो देऊच, पण दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत अपयश आले तरी गाफील न राहता शिवसेनेला जे काही नवे चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघरी पोहोचविण्यासाठी कंबर कसा" असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना केले आहे. 


दरम्यान एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीमुळे शिवसेनेत फुट पडली आहे. तर शिंदे गटाने मुळ शिवसेना आमचीच असल्याचा दावा करत शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाचे चिन्ह आपल्याला मिळावे अशी मागणी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies