मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचदरम्यान, भारतीय हवामान खात्याने राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे १२ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विशेषत: कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईतही पुढील दोन दिवस भारतीय हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात येणाऱ्या या गावांमध्ये पावसानंतर पूरस्थिती निर्माण झाली असून, त्याचा फटका लोकांना बसला आहे.
तसेच, आता भारतीय हवामान खात्याने राज्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर कोकणातही अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याचदरम्यान, हवामान खात्याने कोकणात पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने रायगडमध्ये २ एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मुंबईतही मुसळधार पाऊस पडत आहे, आता पुढील दोन दिवसही मुंबईत ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मुंबईत १२ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट असणार आहे.