नागपूर : मला सांगण्यात आले की विदर्भात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धरणाच्या बॅक वॉटर मुळे रस्ते बंद झाले आहेत. शेतकऱ्यांचा शेतामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे दुसऱ्यांनी सांगीतले म्हणूण विश्वास न ठेवता मी स्वतः पाहिल्यावर सगळी परिस्थीत जाणून घेणार आहे. त्यानंतर सगळे विरोधक बसून सभागृहात प्रश्न मांडणार आहोत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मदत करतोय म्हणून सांगितले, पण ते कृतीत उतरवायला पाहिजे असे वक्तव्य पवार यांनी केले.
तसेच, एकीकडे पावसाळ्यात शेतकरी आत्महत्या करत नाही. मात्र, आज ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याना सरळ मदत करावी अशी मागणीहि अजित पवार यांनी यावेळी केली.
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार आज गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत.यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले.