मुंबई: निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना ८ ऑगस्ट रोजी शिवसेना खरी कोणाची यावर लेखी पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यावर शिवसेनेचे नेत संजय राऊत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. शिवसेना आमची आहे त्यासाठी पुरावा तुम्हाला काय पाहिजे, सिमा प्रश्नासाठी मेलेले आमचे ६९ आमचे हुतात्मे हा पुरावा आहे. हजारो आंदोलनातून आमची लोक मारली गेलीत हा पुरावा आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, अस वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच, १०-२० लोक पैसे देऊन फोडले हा पुरावा होऊ शकत नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
शिवसेनेने राज्यात अन्यायाच्या विरोधात काम केले आहे. राज्यातील जनता तुम्हाला उत्तर देणार आहे, तसेच हे सरकार कोणाचे आहे त्यामुळे आता असा निर्णय घेणार ते. खरं म्हणजे महाराष्ट्र सरकार अस्तित्वातच नाही, एक महिना झाला तरी सरकारचे अस्तित्व दिसत नाही. दोघांचे मंत्रिमंडळ आहे. अजूनही चाचपडत आहेत सरकार बनवण्यासाठी आणि निर्णय घेतात मोठ मोठे जे निर्णय बेकायदेशीर आणि असविधानिक आहेत, असेही राउत यांनी मोठे वक्तव्य केले.
याशिवाय, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आहे, आणि त्या शिवसेनेचे प्रमुख हे उद्धव ठाकरे आहेत. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक तुम्हाला माफ करणार नाही. राज्यात बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने शिवसेना पुढे निघाली आहे, असेही संजय राऊत म्हणाले.