मुंबई : बदलेलील कामाची वेळ, अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी व सतत चिंता केल्यामुळे आपल्याला मानसिक ताण येतो. हा त्रास कमी व जास्त होऊ शकतो. यावर वेळीच लक्ष न दिल्यास ही समस्या गंभीर होऊ शकते आणि पुढे जाऊन हा एक गंभीर आजार देखील बनू शकतो. आपण ताणतणाव दूर करण्यासाठी काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल.
यासाठी तणावाच्या सुरुवातीच्या काळात दीर्घ श्वास घेऊन त्याला नियंत्रणात ठेवता येते व तणावाची पातळी कमी होते. श्वास घेण्याच्या पध्दतीकडे लक्ष द्या.
व्यायाम, योगा किंवा झुंबा, एरोबिक्स सारखे व्यायाम करा. यामुळे आपल्याला तणाव दूर करता येईल आणि आपण दिवसभर व्यस्त असल्यामुळे नकारात्मक गोष्टींबद्दल कमी विचार करू शकतो.
नित्यक्रमात सकस आहाराचा समावेश करा. आहारातून जंक फूड आणि बाहेरील गोष्टी पूर्णपणे काढून टाका. स्वतःला आनंदी ठेवा. अशावेळी आपण हसण्याचा व्यायाम किंवा काही कॉमेडी शो पाहू शकतो. दररोज किमान ८ तासांची झोप घ्या.
तसेच, तणाव कमी करण्यासाठी इतरांमध्ये मिसळा. त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाणे खूप आवश्यक आहे. स्वत:ला व्यस्त ठेवा.