धुळे : साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे तीन चिमुकल्यांवर काळाने घाला घातला आहे. बाहेर खेळण्यासाठी जातो असे सांगून डोहात पोहायला गेलेल्या तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. डोहाच्या पाण्यात उड्या मारल्यानंतर तिघांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी या तिघांना पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.