Type Here to Get Search Results !

“आजपर्यंत जे झालं नाही ते पंढरपूरसाठी करणार”: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे!



पंढरपूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची महापुजेनंतर पंढरपूरमधील आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी पंढरपूरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे आश्वासन दिले.



'आजपर्यंत जे झालं नाही ते पंढरपूरसाठी करणार असून पंढरपूरचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 'हा मेळावा बाळासाहेब ठाकरेयांच्या विचारांचा मेळावा आहे, आम्ही केलेलं बंड हे अभूतपुर्व होते. एकीकडे सत्ताधिश होते. एकीकडे आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, पन्नास आमदारांनी विश्वास ठेवणे ही साधीसोप्पी गोष्ट नाही.'



आम्ही ही एक विचारांची लढाई लढतोय, बाळासाहेबांचे, तेजस्वी हिंदुत्वाच्या विचारांची ही लढाई आहे. आनंद दिघेंच्या कृपेमुळे मी आज इथे आहे. आनंद दिघेंच काम हिमालया येवढे मोठे होते. प्रसिद्धीपासून ते अलिप्त राहिले. शिवसेना हेच माझे ऐश्वर्य म्हणून ते जगले. शाखा हेच घरं. त्यांच काम कधीच विसरता येणार‌ नाही. त्याचा आदर्श माझ्यासमोर आहे. त्यांच काम आहे, ते कधी विसरू शकणार नाही असे मुख्यमंत्री यांनी यावेळी वक्तव्य केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies