मुंबई - भारताचे १५ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी ४,००० हून अधिक सदस्य आज मतदान करणार आहेत. यंदा एनडीएकडून द्रौपदी मूर्म आणिा युपीएकडून यशवंत सिन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या निवडणुकीत महाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मू यांना विक्रमी मते मिळणार, तसेच द्रोपदी मुर्मु यांचा विजय निश्चित आहे.तसेच, द्रोपदी मुर्मु यांना रेकॉर्ड ब्रेक समर्थन मिळेल असेही आशिष शेलार म्हणाले.
पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, आम्हाला महाविकास आघाडीचे अस्तित्व मला दिसत नाही. महाराष्ट्रातून एनडीएच्या उमेदवारास मोठ्या संख्येने मतदान होईल. तो आणखी एक राजकिय इतिहास ठरेल. राज्यसभा, विधानसभा निवडणूकीत काय झालं ते आपण पाहिलं आहे. पक्षमर्यादा झिडकारुन आज द्रोपदी मुर्मु यांच्या समर्थनात मतदान होईल. सकाळी उठून माध्यमांना प्रतिक्रिया द्यायची आणि दुपारी कोर्टात जायचे .एवढेच काम आता शिवसेनेच्या नेत्यांकडे राहिले आहे अशी टीका देखील आशिष शेलार यांनी येवेळी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रपतीपदाचा निकाल 21 जुलै रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर 25 जुलै रोजा नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल.