Type Here to Get Search Results !

“भाजपला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचेत”; ‘यांची’ भाजपवर टीका!

 


मुंबई: शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आता शिवसेनेच्या एकूण खासदारांपैकी १४ खासदार शिंदे गटात दाखल होणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. दरम्यान हे चौदा खासदार शिंदे गटाच्या बैठकीसाठी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमिवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. 



यावेळी संजय राउत म्हणाले, “लढाई कोणतीही असुद्या चिन्हाची असो नाहीतर निवडणुकीची असो आम्ही समर्थ आहोत. भाजपला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. त्यासाठी शिवसेना फोडण्याचे काम सुरू आहे. पण यामुळे शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. आमदार, खासदार ही शिवसेनेची ताकद नाही. शिवसेनेची ताकद रस्त्यावर आहे. भाजपला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत,” अशी जोरदार टीकाही  संजय राऊत यांनी केली.



तसेच,  महाराष्ट्रात आमदार, खासदारांच्या घरासमोर पोलिसांचा पहारा वाढवला आहे. ज्यांच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा आहे, त्यांना सभागृहात येण्याचे अवघड करु, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies