Type Here to Get Search Results !

आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने बांधलेला पूल गेला वाहून; आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा पूल उभारणार!



नाशिक : काही महिन्यांपूर्वी तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारने नाशिकमधील शेंद्रीपाडा गावात लोखंडी पूल उभारण्यात आला होता. मागील आठवड्यात हा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पूल पुन्हा तातडीने उभारण्याचे आदेश दिले आहेत.



त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेंद्रीपाडा येथे उभारण्यात आलेला पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. दरम्यान, आता वाहून गेलेल्या पुलाच्या जागी तातडीने दुसरा लोखंडी पूल उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आल्या. पुढच्या २-३ दिवसांत या ठिकाणी तब्बल १५०० किलो वजनाचा नवा लोखंडी पूल बसवण्यात येणार आहे. 


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूल पुन्हा नव्याने उभारण्याचे आदेश दिले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies