मुंबई: शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे शिंदे सरकार आणि भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आजही त्यांनी सरकारवर टीका केली आहे. हे सरकार बेकायदेशीर असून या एक दुजे के लिए चित्रपटाचा लवकरच राजकीय अंत होईल असे संजय राऊत म्हणाले आहेत.
यावेळी संजय राऊत म्हणाले, “ज्या पद्धतीने हे निर्णय सुरू आहेत एक प्रकारे प्रखर बोलण्यावर बंदी आणली आहे. अश्या प्रकारे बंदी आणणे लोकशाहीचा गळा घोटणे आहे. लोकशाहीची भीती एखाद्या सरकारला वाटत असेल तर लोकशाहीला भीती आहे. या देशात लोकशाही आहे का हा प्रश्न जगाला पडेल असा खोचक टोला राऊतांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
तसेच, पुढे ते म्हणाले की, गेल्या 56 वर्षात ज्यांनी शिवसेना सोडली ते हद्दपार झाले. मुळात हे सरकारच बेकायदेशीर आहे. एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्रि असा हा सिनेमा आहे, या सिनेमाचा राजकीय अंत होईल असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे.