मुंबई : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला नसतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा कारभार हाताळत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात पूरस्थिती असतानाही नुकसान भरपाईचा कोणताही निर्णय झाला नाही. मुख्यमंत्री नातवाला भेटायला चार तास घालवतात, पण पूरग्रस्त भागात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, असे म्हणत खडसे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी एकनाथ खडसे म्हणाले, राज्य सरकारची आता आयसीयू पेशंटसारखी परिस्थिती झाली आहे. सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोघांच्या नेतृत्वाखाली सरकार चालू आहे, असे वक्तव्य करत खडसे यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरात निशाणा साधला.
तसेच, राज्यात पूरस्थिती असतानाही नुकसान भरपाईचा कोणताही निर्णय झाला नाही. मुख्यमंत्री नातवाला भेटायला चार तास घालवतात, पण पूरग्रस्त भागात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, असा टोला लगावत खडसे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे.