Type Here to Get Search Results !

प्रवासी बस १०० फूट उंचावरुन नदीत कोसळली; १२ प्रवाशांचा मृत्यू!



धार: मध्य प्रदेशच्या धारमध्ये बसचा भीषण अपघात झाला. इंदूरहून पुण्याकडे येणारी बस नदीत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली  आहे. तर १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्रातील आहे. प्रवाशांना घेऊन निघालेली बस खालघाट पुलाचे कठडे तोडून १०० फूट उंचावरून नर्मदा नदीत कोसळली. मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला.या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे.



तसेच, नदीतील पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत ९ जणांचे मृतदेह वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. नदीतील खोल पाण्यात बस बुडाली आहे. त्यामुळे या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, हेहि अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 



दरम्यान, अपघातग्रस्त बस ही इंदूरहून पुण्याकडे येत होती. त्यावेळी पुलाचे कठडे तोडून १०० फुटांवरून ती नर्मदा नदीत कोसळली. नदीतून बस काढण्यासाठी सर्व यंत्रणा आणण्यात आली आहे,  तसेच, इंदूर आणि धारहून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, बचावकार्याचा आढावा घेत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies