अहमदाबाद : गुजरातमध्ये विषारी दारु प्यायल्याने २० जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी मिथेनॉलचा पुरवठा करणारा आरोपी जयेश याला पोलिसांनी अटक केली आहे. आता या घटनेची चौकशी एसआयटीकडून करण्याचे आदेश दिले आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, अहमदाबाद आणि बोटाद मध्ये २० पेक्षा अधिकांची तब्येत बिघडली होती. या घटनेच्या चौकशीत, ज्यांची तब्येत बिघडली आहे त्यांनी दारू प्यायल्याचे समोर आले. या २० जणांची रसायनयुक्त पदार्थ घेतला होता. तब्येत बिघडल्याने काही जणांना भावनगरमध्ये दाखल केले होते. यानंतर या रुग्णांना एसएफएलचे नमुने घेण्यासाठी गांधीनगरला पाठवण्यात आले.
दरम्यान, या घटनेच्या तपासात एकूण पाच-सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.