Type Here to Get Search Results !

राज्य सरकारचा मोठा निर्णय: सरपंच, नगराध्यक्षांची निवड जनतेतून होणार!



मुंबई: राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची आज बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची तसेच नगरपंचायत नगराध्यक्षाची थेट जनतेमधून निवड होणार आहे, हा मोठा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे.


महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करून राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची थेट जनतेमधून निवड केली जाणार आहे. सरपंच पदाबरोबरच नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेण्यात येणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies