रत्नागिरी :आज खासदार विनायक राऊत हे रत्नागिरीत माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला.
यावेळी ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना माझ्या मध्यस्थिमुळे विधानसभेची उमेदवारी मिळाली. त्याचा आज मला पश्चाताप होत. माझ्या आयुष्यातील हे मोठ पाप झाले आहे. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सांगितले नसते तर एकनाथ शिंदेंना आमदारकी मिळाली नसती, असे किस्सा सांगत असताना राउतांनी भाष्य केले.
तसेच, राउत पुढे म्हणाले, “माझ्यामुळे ते आमदार झाले असेही खासदार राऊत यांनी म्हटले. ते म्हणाले एकनाथ शिंदे सभागृह नेते होते. मी संपर्कप्रमुख होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सतीश प्रधान यांना गुलाल लावला आणि त्यास एबी अर्ज दिला. त्यावेळी मी बाळासाहेब यांना एक तरुण आहे. त्यास उमेदवारी द्यावी अशी विनंती केली. त्यानंतर बाळासाहेबांनी एकनाथ शिंदेंना उमेदवारी दिली. ही गोष्ट खरी आहे का नाही ते आता एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आई वडीलांची शपथ घेऊन सांगावे असेही राउत म्हणाले.