Type Here to Get Search Results !

“संजय राऊताना कुणीही गांभिर्याने घेत नाही”: ‘यांची’ राऊतांवर टीका!



मुंबई : राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी केली आहे. तसेच, शिवसेनेचे खासदार संजय राऊत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 



संजय राऊत यांची दुटप्पी भूमिका आहे. राऊत यांना अशाच प्रकारे बोलायचे असते. त्यांना कुणीही गांभिर्याने घेत नाही, असे म्हणत दरेकर यांनी राऊतांवर टीका केली आहे.



तसेच, यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केव्हाही मंत्रिमंडळ विस्तार करु शकतात. जे कायद्याला योग्य वाटतं तेच होत असतं. विरोधकांचे बोलणे हे न्याय व्यवस्थेवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि याचा काहीही संबंध नाही. शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला दिलासा दिला आहे.महाविकस आघाडी सरकारवर विश्वास नाही. त्यामुळे 165 लोकांनी शिंदे सरकार पाठींबा दिला आहे. स्वतःच्या बाजूने निकाल लागला तर कोर्टाच्या निर्णयाचा आनंद व्यक्त करायचा. तसे झाले नाही तर कोर्टावर दबाव आहे, असे बोलायचे, असेही वक्तव्य संजय राऊत यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies