नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. अशीच परिस्थिती शुक्रवारी दिवसभरातील आहे. गेल्या 24 तासांत देशात 21,411 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे. यादरम्यान, 67 जणांचा मृत्यूही झाला. देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची एकूण संख्या आता 4,38,68,476 वर पोहोचली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनामुळे आतापर्यंत 5,25,997 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 1,50,100 आहे. गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णांमध्ये 618 ची वाढ झाली आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासात कोरोना संसर्गाची सर्वाधिक प्रकरणे नोंदवणाऱ्या पहिल्या 5 राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचे 2 हजार 515 रुग्ण आढळून आले आहे. त्यानंतर केरळमध्ये 2 हजार 477, पश्चिम बंगालमध्ये 2,237, तामिळनाडूमध्ये 2,033 आणि कर्नाटकमध्ये 1,562 रुग्णसंख्या नोंदवली गेली आहेत.