Type Here to Get Search Results !

“...पण मी पुन्हा आलो आणि एकटा आलो नाही तर यांनाही...”: देवेंद्र फडनविसांचा टोला!

 


मुंबई :  महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठरावाची लढाई जिंकली आहे. यानंतर अभिनंदन प्रस्ताव मांडताना उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. परंतु, "आज  सभागृहात  देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी तेव्हा कविता केली होती मी पुन्हा येईन... तेव्हा माझी टिंगल-टवाळी केली. पण मी पुन्हा आलो आणि एकटा आलो नाही तर यांनाही घेऊन आलो”, असे फडणवीस म्हणाले.

 

तसेच ते फडणवीस  पुढे म्हणाले,  मी आता या सर्वाचा बदला घेणार, हा बदला म्हणजे मी यांना माफ करणार. त्याचप्रमाणे, काही लोकांना असे वाटायचे आम्ही सत्तेसाठी करतो, सत्ता आमचे साधन आहे. मी म्हणालो होतो, जेव्हा सरकार जाईल तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ. आमची खंत होती, जनतेने आम्हाला बहुमत दिलं आणि काहींनी हिरावून नेऊ, जनतेने दिलेल्या बहुमताचा सन्मान आम्ही करून दाखवू, मला माझ्या नेत्यांनी आदेश दिला उपमुख्यमंत्री पदाचा असेही फडणवीस म्हणाले.


दरम्यान,  एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी मी पूर्णपणे उभा राहीन, त्यांच्यात आणि माझ्यात दुरावा दिसणार नाही आणि आमची मैत्री नेहमीच कायम राहील असेही फडणवीस म्हणाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies