मुंबई: भाजप आणि शिंदेच्या सत्तापिपासू वृत्तीने महाराष्ट्राची अवस्था अनाथ लेकरासाठी केली आहे, असे म्हणत अतुल लोंढे यांनी सरकारवर टीका केली आहे.
कॉंग्रेसचे नेते आणि प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्विट करत म्हणाले की, "महाराष्ट्रात भाजप प्रणित शिंदे सरकार येऊन १५ दिवस झाले पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. उपमुख्यमंत्र्यांनाही खाते दिले नाही. राज्यात पूरस्थितीमुळे १०० हून अधिक बळी गेले आहेत. भाजप आणि शिंदेच्या सत्तापिपासू वृत्तीने महाराष्ट्राची अवस्था अनाथ लेकरासाठी केली आहे" असे ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, राज्यात सत्तांतर होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे, मात्र अजूनही नव्या सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही. अशातच आता मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात आलेल्या पूराने थैमान घातले आहे. याबाबत बोलताना कॉंग्रेसचे नेते आणि प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सरकारवर बोचरी टीका केली आहे