मुंबई: शिंदे गटातील आमदारांना दुसऱ्या पक्षात विलिन होण्याशिवाय पर्याय नाही. आमदार आमच्या संपर्कात आहे, त्यामुळे राज्यात पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये, असे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केले.
तसेच, शिंदे गटातील आमदारांना दुसऱ्या पक्षात विलिन व्हायला लागणार आहे. मग हे स्वत:ला शिवसैनिक कसे म्हणतील, यातील अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. शिवसेना येणाऱ्या सर्व निवडणुका लढेल. भाजपला शिवसेना फोडायची होती. ती त्यांनी फोडायचा प्रयत्न केला आहे. भाजपचे हे यश दिर्घकाळ टीकणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, राज्यात सत्तांतर झाला असून शिंदे-फडणवीस सरकारचा अजुनही विस्तार झालेला नाही. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरुन आता संजय राऊत यांनी वरील वक्तव्य केले आहेत.