नवी दिल्ली: काही दिवसापूर्वी राज्यात ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. ज्या ठिकाणी निवडणुकासाठी अर्ज भरलेले नाहीत त्या ठिकाणी त्या निवडणुका पुढे ढकलण्याचे आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
तसेच, राज्यातील ९२ नगरपरिषदांसाठी नव्या सूचना काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आज ओबीसी आरक्षण संदर्भात सुप्रिम कोर्टात सुनावणी होती. आता पुढील सुनावणी १९ जुलै रोजी होणार आहे.