Type Here to Get Search Results !

'बंडखोर आमदारांनी बंडाचे कारण ठरवण्यासाठी कार्यशाळा घ्यावी”;यांचा बंडखोर आमदाराना टोला!



मुंबई : बंडखोर आमदारांनी पहिल्या दिवशी आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेतून बाहेर पडल्याचे सांगितले नंतर राष्ट्रवादी निधी देत नाही, असे सांगितले. त्यामुळे बंडखोरांनी बाहेर का पडलो? याचे एक कारण ठरवावे हवतर यासाठी बंडखोर आमदारांनी एक कार्यशाळा घ्यावी असे  म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी शिंदे गटातील आमदारांना डिवचले आहे. 



यावेळी बोलताना राऊत म्हणाले, 'शरद पवार साहेबांसोबत राजकीय चर्चा झाली, वर्तमान भविष्य आणि भूतकाळ विषयी चर्चा झाली. महाविकास आघाडीतले सगळे नेते आम्ही लवकरच भेटणार आहोत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली अशा चर्चा यापुढे सुद्धा होत राहतील. याशिवाय,  व्हीप बदलणे हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. लोकसभेमध्ये चीफ व्हीपचे  महत्त्व खूप असते, असेही राउत म्हणाले.



याशिवाय ते पुढे म्हणाले, 'बंडखोर आमदारांनी शिवसेनेतून बाहेर का पडलो याबाबत काहीतरी एक कारण ठरवावे. हवेतर त्यांनी यासाठी एखादी कार्यशाळा घ्यावी,  आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाहेर पडल्याचं त्यांनी आधी सांगितलं नंतर राष्ट्रवादी निधी देत नाही असे सांगितले त्यामुळे नेमके एक कारण ठरवा असे म्हणत राउतांनी बंडखोर आमदारांना जोरदार टोला लगावला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies