Type Here to Get Search Results !

कारची पाच जणांना धडक; दोघांचा जागीच मृत्यू,३ गंभीर जखमी!



अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात भीषण अपघात झाला. उंबरे येथे माळवाडी शिवारात काल, शुक्रवारी रात्री सातेसात वाजता राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यावर एका भरधाव कारने पाच जणांना उडविले. यात दोघांचा मृत्यू झाला आहे तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, अपघात झाल्यानंतर कारचालकाने कार भरधाव वेगात पळवली आणि यानंतर पुढे दोन दुचाकींना धडक देत त्यावरील चौघांना गंभीर जखमी केले. संजय उर्फ सांडू अर्जुन हिवराळे (वय ३२) आणि कैलास छबुराव पंडित (वय ४५, दोघेही रा. माळवाडी, उंबरे) अशी मृतांची नांवे आहेत. तर सुरेश झुगाजी ससाणे, सोन्याबापू बाबासाहेब गायकवाड आणि बादशहा शेख (तिघेही रा. माळवाडी, उंबरे) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, शनिशिंगणापूरच्या दिशेने एक कार (एमएच ०९ बीएक्स ३६१६) भरधाव वेगाने चालली होती. मोलमजुरी करुन उपजिविका करणारे सुरेश ससाणे रेस्त्याने पायी चालले होते. त्यांना कारने जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर गंभीर जखमी झालेले सुरेश ससाणे यांना मदत न करता या कार चालकाने भरधाव वेगाने कार शनिशिंगणापूरच्या दिशेने नेली. पुढे एक किलोमीटर अंतरावर पोहोचला असता त्याने आणखीन दोन दुचाकींना कारने जोरदार धडक दिली. या दोन दुचाकींवर एकुण चारजण प्रवास करत होते. हे चौघेही बांधकाम मजुरी करणारे कामगार होते.




दरम्यान,  घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्यांपैकी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमींवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात कार चालकांविरुद्ध भरधाव वाहन चालवून रस्ता अपघातास आणि मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा नोंदविला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies