बाडमेर : राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात पगार कमी असल्यामुळे कौटुंबिक खर्च भागत नव्हता. त्यामुळे पती-पत्नीमध्ये अनेकदा पैशांवरून वाद होत होते. बुधवारी पुन्हा पती-पत्नीमध्ये वाद झाला असता, पत्नीने बेल्टने गळा आवळून पतीची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली. अनिल कुमार (वय 32) असे मयत पतीचे नाव आहे. तर मंजूश्री (वय 28) असे संशयित आरोपी पत्नीचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, बाडमेर जिल्ह्यातील कोतवाली गावात राहणाऱ्या अनिल कुमार नामक युवकाचा मंजूश्री हिच्यासोबत 2018 साली विवाह झाला होता. अनिल कुमार हा एका खासगी कंपनीत कामाला होता.
अनिलच्या पत्नी मंजूश्री हिला महागडे वस्तू खरेदी करण्याची आवड होती. त्याचबरोबर तिला दारू आणि सिगारेटचे व्यसनही होते. दरम्यान, पतीचा पगार कौटुंबिक खर्चात कमी पडत असल्याने मंजूश्री आणि अनिल कुमार यांच्यात नेहमी वाद व्हायचे. बुधवारी मंजूश्रीने पती अनिलला घरी येताना मद्याची बॉटल आणण्यास सांगितली. पत्नीचा हट्ट पुरवण्यासाठी अनिल कुमारने मद्याची बॉटल आणली. रात्री दोघांनीही मद्यप्राशन केले.
दरम्यान, दोघांमध्येही पैशांवरून वाद झाला. दरम्यान, मंजूश्रीने दारूच्या नशेत बेल्टने पती अनिल कुमारचा गळा आवळला. या घटनेत अनिल कुमारचा जागीच मृत्यू झाला. अनिलच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पत्नी मंजूश्री हिला अटक केली आहे. पोलिस चौकशीत तिने आपला गुन्हाही मान्य केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.