दिल्ली: दिल्लीमध्ये रोहिणी भागात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्दयीपणे गळा आवळून हत्या केली. या घटनेची सूचना मृत महिलेच्या दिराने पोलिसांना दिली. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, 6 वर्षाआधी आरोपी अनिलने उडीसाला राहणाऱ्या रश्मि नावाच्या तरूणीसोबत प्रेमविवाह केला होता. त्याआधी अनिल बुलंदशहरात राहत होता. एक वर्षाआधीच हे दाम्पत्य दिल्ली राहण्यासाठी आले होते. रोहिणीच्या सेक्टर 16 मध्ये एक घरा भाड्याने घेऊन दोघेही राहत होते.
यादरम्यान फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या बबलू नावाच्या एका तरूणासोबत रश्मिची मैत्री झाली. ज्यावरून रश्मि आणि अनिलमध्ये नेहमीच वाद होत होते. या भांडणाबाबत अनिल आपला भाऊ सुनील याला अधून मधून सांगत राहत होता.
काही दिवसांआधी अनिल घरातून कुठे बाहेर गेला होता. जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याला दिसले की, बबलू पत्नी रश्मिसोबत घरात आहे. यावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला.
दरम्यान, रागाच्या भरात अनिलने पत्नी रश्मिचा गळा आवळून तिची हत्या केली. हत्येनंतर तो फरार झाला.