पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाच्या चरणी राज्यावरील सर्व संकट दूर व्हावेत असे साकडे घातले आहे.
कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. राज्यातील गरिबांना चांगले दिवस येऊदेत. कष्टकरी कामगार शेतमजूर, उद्योजक या सर्वांना सुखाचे आनंदाचे हे वर्ष जावो, कोरोनाची कायमची जाण्याची वेळ आली आहे. पांडूरंगाच्या पुण्याईने हे संकट देखील दूर होईल. राज्यावरील सर्व अडचणी दूर व्हावेत, असे साकड मी घातले आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
'हे सर्व सामान्यांचे सरकार आहे. यासाठी आम्ही काम करणार आहे. पंढरपुरात निधी देत असताना हात आखडता घेणार नाही. कोणताही घटना असमाधानी असता कामा नये, सर्वांना आम्ही समाधान करणार नाही. आम्ही सर्वसामान्य आहोत. आमचे सर्व आमदार तळागाळातून आले आहेत, त्यामुळे सर्व सामान्यांची आम्ही कामे करणार आहे, असंही शिंदे म्हणाले.
राज्यात चांगला पाऊस पडू दे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत यासाठी शासन कटीबद्ध आहे. आम्ही पहिल्याच बैठकीत जलयुक्त शिवार योजना सुरु केली आहे. आज आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो आहे. त्यांनीही राज्याला चांगले दिवस येण्यासाठी योजना राबवा. केंद्र तुमच्या पाठिमागे आहे, असंही शिंदे म्हणाले.