मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदे गट असा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. अशातच नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी एक खळबळजनक ट्विट केले आहे.
नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली. त्यावेळी त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सुपारी दिली होती. असा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास ट्विट करून नितेश राणेंनी हा आरोप केला. तसेच, आता म्याव म्याव संपू द्या, त्यानंतर आम्ही व्याजासकट वस्त्रहरण सुरू करू असा इशाराही आमदार नितेश राणेंनी दिला आहे.
Just like Eknath Shinde ji .. several “suparis”were given to finish my father when he left the Sena.. by the so called sober and decent Paksha Pramukh!
— nitesh rane (@NiteshNRane) July 23, 2022
Let the meow meow finish.. then we will start with the “Vastraharan” with interest 😊
दरम्यान, शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. तसेच राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच आता नितेश राणेंनी ट्विट करत नितेश राणे यांनी ट्विट करत नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती असा गंभीर आरोप केला आहे.