बीड - जयंत पाटील यांनी कोणताही निधी आणि मान्यता न घेता, कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या नावाखाली खोटी निविदा काढून, मराठवाड्याची फसवणूक केली आहे. असा गंभीर आरोप पाणी प्रश्नावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी, राष्ट्रवादीचे नेते माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर केले आहेत. तसेच याविषयी कारवाई व्हावी, यासाठी वेळ पडल्यास कोर्टात देखील जाणार असल्याचा इशारा आमदार धस यांनी जयंत पाटलांना दिला आहे.
आमदार सुरेश धस पुढे म्हणाले, की निधीची तरतूद नसताना वित्त व नियोजन विभागाची मान्यता नसताना अशा प्रकारची खोटी निविदा काढताचं येत नाही. ती निविदा काढण्यात आली. त्यामुळे माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खोटीनाटी याला मान्यता दिली आहे.
तसेच, जलसंपदा मंत्री म्हणून पाटलांनी खोटं नाट काम केले, खोटी निविदा काढली, प्रेशराईज केलं, त्यांनी मराठवाड्याची फसवणूक करण्याचे काम केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मी सभागृहात करणार आहे. आणि वेळ पडल्यास कोर्टात देखील जाणार आहे. असा इशारा धस यांनी दिला आहे.